top of page
Search

आपले आचार विचार

  • Writer: Nandkishor Dhekane
    Nandkishor Dhekane
  • May 11, 2020
  • 15 min read

आपण आत्ता पर्यंत पहिले कि जीवनात बाह्य घटकांकडून आपण जे काही शिकतो ते अडचण म्हणून प्राप्त जीवनात कसे कार्य करते. ह्या आधी आपण पहिले कि आपल्या देहाची धारणा आणि आपले आचार विचार उच्चार

ह्यांचा आपल्या प्राप्त जीवनात कश्या प्रकरे प्रभाव पडतो आणि कित्ती पर्यंत आपले जीवन हे त्यांच्याकडून ठरवले जाते. पण ह्या सर्व घटकान मध्ये एक गोष्ट नक्क्कीच सारखी होती आणि ती म्हणजे कि हे सर्व घटक थोड्या

जास्त प्रमाणत अश्या प्रकारे कार्यान्वित झाले ह्याचे मूळ कारण हे आपण मध्येच होते, पण असे काही घटक आहेत का जे खरोखरच आपण control किंवा define करू शकत नाही ? आणि असले तर ते कोणते

आहेत? ह्याचा थोडासा आपण समजण्याचा आत्ता पप्रयत्न करूया.

मानंसाच्या जीवनात अडचणी येतात ह्याला बरेचदा तोच स्वत कारण असला तरी काही काही वेळा अये पण नक्कीच घडते कि एखाद्या होणार्या त्रासा मध्ये प्रत्यक्ष त्याचा सहभाग काहीच नाही पण केवळ त्यावेळी तोः तिथे

उप्स्तीत आहे म्हणून किंवा केवळ काही कारण परत्वे त्याचे व्यक्तिगत वा पारिवारिक वा सामाजिक हितसंबंध असल्याने तोः तश्या प्रकारच्या प्रसंगाला समोर जातो किंवा त्याला तश्या प्रकारची अडचण सहन करावी लागते.

जीवशास्त्र असे सांगते कि माणूस जन्माला येतो म्हणजे जो गर्भ मातेच्या उदरात आहे त्याची वाढ पूर्ण होते मग तो जन्म घेतो पण वाढ पूर्ण  होणे आणि वाढ परिपूर्ण होणे ह्यात खूप फरक आहे. वाढ पूर्ण होते म्हणजे आपण त्या

देहाचे अवयव हे पूर्ण स्वरूपात कोणत्या पण विसंगती सकट दिसतात, पण वाढ परिपूर्ण तेंव्हाच होते जेंव्हा तोः जन्माला आलेला जीव हा देहिक आणि अत्त्मिक दृष्ट्या परिपूर्ण होतो, आत्मिक दृष्ट्या परिपूर्ण होणे म्हणजे

नक्की काय असे आपणास नक्की वाटू शकते, तर देहाचे दोन प्रमुख भाग आहेत प्रामुख्याने,  १  म्हणजे देहिक ज्यात ज्ञानेद्रीये, कर्मेंद्रिये, पंचतन्मात्रे ह्यांचा समावेश होतो, आणि अम्तिक म्हणजे जन्मला येताना येणारे पाच

प्रधान ऋणानुबंध, चैतन्य, बुद्धी, मन , चित्त, अहंकार, ह्यातील बुद्धी मन चित्त आणि अहंकार ह्या अवस्था आहेत. त्या आपण अनानुभावू शकतो पण त्यांचे तरीदेखील वर्गीकरण आत्मिक स्थितीशी केले कारण ह्या गोष्टी कायम

आत्म्याशी किंवा चैतन्य शक्ती शी जोडलेल्या आहेत. आणि वर देहिक वर्गीकरण बघताना जे आपण पंचज्ञानेद्रीये, पंचकर्मेंद्रिये, आणि पंचतन्मात्रे पहिली आहेत तती आपल्या देहिक आणि आत्मिक शक्तीस जोडून ठेवण्यचे

आणि  दोन अवस्थांमधून energy exchange करायचे कार्य करत  असतात.

ह्यामध्ये सर्वात प्रधान कार्य आहे ते म्हंजे ऋणानुबंधाचे  कारण जन्म घेताना जे पांच ऋणानुबंध आत्म्याबरोबर जोडले जातात त्यावर पुढच्या जीवनाची पूर्ण development ठरणार असते.  आपल्या जीवांचे कार्य कारण आणि

भाव तीनही अवस्था ह्या पूर्णपणे रुनाबंधांवर अवलंबून असतात. आपल्या जीवनात आत्मिक शक्ती किंवा चैतन्यशक्ती जी आहे तिचे कार्य ह्या रुनानुबंधांवर सर्वस्वी अवमालाबून असते जीवनात येणाऱ्या सर्व अडचणीचे

मुल्करण हे ह्या पांच रुनानुबंधांमध्ये आहे . इतके हे महत्वाचे असतात. ह्यातील काही ऋणानुबंध निर्माण होण्यास कधी आपण कारण असतो तर कधी आपण कारण नसतो पण ह्याचमुळे त्यांचे कार्य थांबते असे नाही. आपल्या

प्राप्त जीवनात ते अव्याहत पाने चालूच असते.

पण हे ऋणानुबंध म्हणजे नक्की काय आहे? ह्या शब्दची आपणा फोड केली तर दोन वेगळे शब्ध मिळतील ऋण आणि अनुबंध. ऋण म्हणजे सध्या सोप्या भाषेत कर्ज  किंवा केलेली मदत. कर्ज आपण कधी घेतो जेन्वा आपणास

एखादी गोष्ट करायची आहे, किंवा हवी आहे आणि काही कमतरतेमुळे आपण ती घेण्यास किंवा करण्यास असमर्थ असतो तेंव्हा आपण दुसर्या एखाद्या व्यक्ती कडून कर्ज घेतो आणि ती अपूर्ण अशी गोष्ट पूर्ण करतो.

व्यावहारिक जगामध्ये जेंव्हा एखादी वस्तू विकत घेण्यासाठी आपणास पैसे कमी पडतात तेंव्हा आपण काय करतो, आपण एखाद्या वित्तापेधीवर जातो आणि कर्ज घेतो  आणि नंतर installments मध्ये ती रक्कम आपण त्या बँकेला परत करतो त्याला आपण म्हणतो कि मी बँकेकडून कर्ज घेतले  पण आपणास बँकेकडून हे कर्ज्जा का घ्यावे लागले कारण जेवढी रक्कम आपल्याला आपली अडचण भागावाण्यासाठी त्या क्षणी हवी होती तेवढी एकरकमी आपल्याकडे नवती पण ती बँकेकडे होती म्हणून आपण बँकेकडे गेलो रक्कम कर्जाऊ घेतली आणि अडचणीचे निवारण केले आणि त्या घेतल्या रक्कमेइतकि रक्कम आपण बँकेला परत केली व तसेच अडचण असताना आपली अडच  बँकेने भागवली म्हणून बँकेने आकारलेले व्याज पण आपण दिले. हे झाले व्यवहारामध्ये. इथे ऋणाचा संबंध काय, तसा प्रत्यक्ष दर्शी काहीच नाही पण अप्रत्यक्षपणे नक्की आहे जो आपण नंतर बघूया. तसेच ऋणानुबंध ह्या शब्धात जो ऋण हा शब्ध आहे तोः पण तसाच आहे.  ह्यामध्ये घडणारी क्रिया पण तसीच आहे पण मुख्य फरक कोणता असेल तर तो असा आहे कि वरच्या व्यावहारिक उदारणामध्ये आपण हे पहिले कि अपन्ल्याला पैशाची अडचण होती ती अडचण आपण बँकेकडून सोडवली कारण ती materialistic गोष्टीची होती, पण जेंव्हा अशी अडचण  उभी राहते जेथे पैसा अडका किंवा इतर व्यावहारिक गोष्टी नाही तर माणसाची किंवा एखाद्या ईश्वरीय शक्तीची मदत घेऊनच ती सोडवली जाते जिची आपण परतफेड मुद्दल+व्याज अश्या स्वरूपात किंवा इतर कोणत्या पण व्यवहारीक स्वरूपात करू शकत नाही तेंव्हा ते ऋण म्हणून जीवनात कार्यान्वित होते म्हणजेच ऋण म्हणजे असे कर्ज जे आपण एखाद्या व्यक्तीकडून किंवा शक्ती कडून अश्या स्वरूपात घेतो ज्याची आपण कोण त्याच व्यावहारिक गोष्टीनी परिपूर्तता करू शकणार नाही. त्याची परिपूर्णता करायचे निकष हे  आपल्या व्यवहारिक जगाच्या कोणत्याच मानांकनात बसत नाहीत परंतु अश्या मदतीची किंवा कर्जाची किंवा  मदतीची गरज ही आपल्याला आपल्या आर्थिक, प्रापंचिक, पारमार्थिक, आधिदैविक आधिभौतिक, अध्यात्मिक अश्या सर्व प्रकारच्या जीवन प्रकारात लागते आणि ती तेवढ्या सहजपणे  कोणतीपण अवास्तव किंवा अयोग्य किंवा वैयक्तिक लाभाची अपेक्षा न ठेवता समोरच्या व्यक्ती, शक्ती कडून केली पण जाते. व्यवहार आणि ऋण ह्यात हाच मोठा फरक आहे. जो व्यवहार आहे त्यात समोराच्या व्यक्तीला किंवा संस्थेला किंवा शक्तीला तुमच्या कडून काहीतरी in return मिळण्याची अपेक्षा असते आणि त्या अपेक्षेतून ते तुम्हाला मदत करण्यास तयार असतात. उदा. बँकेकडून घेतलेले कर्ज .म्हणजे जेथे समोरच्या माणसाला मदत ही बुद्धि माध्यमातून तारतम्याच्या कसोटीवर पारखून दिली जाते तेथे तोः व्यवहार आहे. आणि जेथे समोरच्या माणसाला केवळ मदत करायची इच्छा जाहली किंवा तोः माणूस आपल्याकडे मदतीसाठी आल्यावर आपण वयैक्तिक स्वार्थ साधण्य पेक्षा त्याच्या अडचणीसाठी शक्य तेवढे मदतकार्य करायचे भावनेतून म्हणजेच मनाने सांगितल्याप्रमाणे बुद्धीतून केले कार्य म्हणजे व्यवहार नाही तर ऋण होय. म्हणजेच तसे पाहता ऋण म्हणजे कर्ज पण होणार नाही तर ऋण म्हणजे निस्वार्थ बुद्धीने केलेली आणि घेतलेली मदत. आत्ता प्रश्न असा ह्येतो कि अशी मदत एखाद्या व्यक्तीला करायची इच्छा का होते? आपल्या घरात लहान मुले असतात तसीच बाजूच्या घरात पण असत्तात पण आपल्या मुलाला साधा ताप जरी आला तरी आपली काळजीने जीव जाताची वेळ येते, कुठे नेऊ, कुठे जाऊ, कोणत्या डॉक्टर कडे जाऊ, ओणते औषध देऊ, कोणत्या औषधाने बरे करू, लवकर का बरा होत नाही इत्यादी अनेक विचारांनी आपला जीव पार कासावीस होतो पण तेच शेजारच्या घरातील मुलगा आजारी पडल तर आपण एवढे अस्वस्थ होत नाही, केवळ दिवसातून दोन तीन वेळा चौकशी करतो आणि शांत बसतो असे का होते? साधे सरळ उत्तर आहे कि आपल्या मुलामध्ये आणि आपल्या मध्ये नात्याच्या किंवा भावभावनेचा एक तरल असा बंध असतो ज्यामुळे आपण आपल्यामुलाची किंवा घरातील व्यक्तीची इतक्या तिडकीने काळजी करतो पण तसा बंध हा शेजारच्या मुलासाठी नाही म्हणून वाटणार्या काळजीचे प्रमाण खूप कमी असते. हे जसे घरातील लोकांबद्दल असते तसेच आपल्या परीवाराव्यातीरिक्त काही अजून लोकां बद्दल पण नक्कीच वाटते परिवारातील नसून पण त्यांना नकळत आपण परिवाराचा एक सदस्याम्ह्णून आपण treat करत असतो कारण तसाच  बंध आपल्या मध्ये आणि त्या लोकांमध्ये असतो, हाच ऋणानुबंध ह्या शब्द्चा दुसरा भाग अनुबंध. वर नमूद केल्याप्रमाणे आपणस जी निस्वार्थ मदत करण्याची इच्छा एखाद्यास हिओते किंवा अत्यंत प्रतिकूल अश्या वेळेत आपण सहजपणे एखाद्याच व्यक्ती कडे वळतो कारण आपल्या मध्ये आणि त्या व्यक्ती मध्ये हा अनुबंध असतो. ह्यामुळे त्या व्यक्तीस तिच्या कळत व नकळत आपणास मदत करण्याची प्रवृत्ती होते, म्हणजे आपण म्हणतो कि माझे आणि त्या व्यक्तीचे नक्कीच काहीतरी ऋणानुबंध होते म्हणून त्या व्यक्तीने मला मदत केली आहे. म्हणजे आपल्या लक्षात असे येईल के वर जो विषय आपण बघतो आहोत तोः विषय केवळ जीवनात अत्यंत महत्वाचा असा नसून तो विषय आणि त्या विषय परत्वे असणारे कार्य हे भावनिक म्हणजेच अत्यंत तरल अश्या स्वरूपात कार्य करतात आणि हे ऋणानुबंध कधी कधी आपले जीवन खूप सुंदर तरी करतात किंवा पूर्नाजीवन यातनामय तरी करतात. तसेच आपण पहिले कि जीवनात अनेक प्रकारच्या अडचणी येतात ज्याचे वर्गीकरण आपण प्रामुख्याने आधिभौतिक, अधिदैविक, आणि अध्यात्मिक असे करतो आणि ह्या अडचणींना जरी रुनानुबंधातील विषय कारणीभूत असले तरी असलेल्या अडचणी प्रमाणे ह्या रुनानुबंधांचे वर्गीकरण पांच रुनानुबंधात केले आहे जे खालीलप्रमाणे, जन्मकर्म, जन्मजन्मांतर, मातृ-पितृ, इतरेजन. ह्या अश्या पांच रुनानुबंधातून माणसाचे जीवन घडत असते. त्याचे पुढचे जीवन ठरत असते आणि त्याचा जीवनावर पडणार परिणाम हा प्रत्येक वयाच्या वेळी आणि अडचणीच्या वेळी देखील वेगवेगळा असतो. त्यासाठी त्या त्या ऋणानुबंधाबद्दल यथायोग्य ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे. कारण जीवनात सर्वात महत्वाचे काही असेल तर ते म्हणजे जन्मकर्मा आणि जन्माकार्मातील विषय जे आजचे प्राप्त जीवांचे कारण आहेत आणि ह्या जन्माकार्मातील जे विषय ठरवले गेले ते इतर ४ रुनानुबंधांमुळे. तेंव्हा आपल्या लक्षात येईल कि ह्यांचे जीवनात काय महत्व असेल ते. आपल्या गुरुनी आपणस शिकवेल कि कर्माची व्यक्त अवस्था म्हणजे जीवन. पण त्या कर्माची अव्यक्त अवस्था ही ह्या रुनानुबंधात आहे कारण जे कर्म आपण जीवन म्हणून देह आणि बुद्धी माध्यमातून व्यक्त करू ते कर्म धारण होनार ते ह्या रुनानुबंधातूनच. कारण कर्म व्यक्त होणे म्हणजे आचार विचार आणि उच्चार ह्याचे एकरूपत्व करून कार्य संपन्न करणे आणि जे विषय ह्या रुनानुबंधात आहेत तेच विषय देह माध्यमाच्या ठिकाणी आत्मिकतव्तातून रुजू झाले आहेत आणि त्यानुसार बुद्धी आणि मनाचे कार्य घडते जे आपल्या अचात्र विचात आणि उच्चारातून देह प्रकट करतो आणि जे कर्म म्हणून धारणा होते. म्हणजेच ह्या सर्वांचा कित्ती सूक्ष्मतम असा परिणाम आपल्या जीवनात आहे हयचे अवलोकन आपणच करावे. हे पांच ऋणानुबंध आपल्या जीवनात काय काय अपेक्षित किंवा अनपेक्षित कार्य करतात ते  पुढच्या भागात बघूया. Advertisements REPORT THIS AD This entry was posted on June 9, 2015, in अध्यात्म शास्त्र जीवन नियंता and tagged ananant, avakash, अहंकार व आ, आचार विचार उच्चार, ऋणानुबंध, education, human life, manav.Leave a commentमानवी जीवन ४ Jun8आपण मागच्या लेख मध्ये पहिले कि जीवनात अडचण म्हणून कार्यान्वित होण्यासाठी संस्कार हा जो प्रमुख घटक आहे त्यात आपले सभोवतालचे जीवन आणि त्या जीवनाचा आपल्या वर होणारा पैर्नाम हा कश्या प्रकारे कार्य करतो, पण तोः तसा कार्य केला गेल्यामुळे तोः जीवनात अडचण म्हणून का उभा राहील? ह्या प्रश्नाचे खरे तर खूपच सोपे उत्तर आहे कि आपण आकलन केलेल्या गोष्टी आपले जीवन ठरवण्य मध्ये खूप मोठा सहभाग दर्शवतात, त्यात आपली विचार करण्याची बैठक पक्की होते, त्या वैचारिक बैठकी नुसार आपण आपले आचार आणि आहार ठरवतो, आणि त्या वर आपण आपले पुढचे ६०-७० वर्षाचे जीवन जगतो. आत्ता झालेल्या ह्या वैचारिक बैठकी मध्ये समजा जीवनास आवश्यक असे व्यावहारिक ज्ञान असेल तर आपण आपले व्यावहारिक आयुष्य खूप उत्तम रित्या नक्कीच जगू पण त्या मध्ये जर कधी आपणास कौटुंबिक जीवन कसे जगायचे आणि आपली कुटुंब प्रीत्यर्थ काय कार्त्य्वे आहेत, काय जबाबदारी आहे आणि काय आपली गरज आहे ह्याचे आकलन झाले नाही तर आपण आपले कौटुंबिक जीवन योग्य प्रकारे जगू शकतो का? नाही न. तसेच आजच्या सर्वसमावेशक अश्या जीवनात मानसाला व्यावहारिक ज्ञान नक्कीच परिपूर्ण आहे पण त्याच्या जीवांनाच्या कार्यपद्धतीचे ज्ञान नाही त्याचे का? आज माणूस शास्त्र किंवा व्यवस्थापन किंवा इतर अनेक क्षेत्रांमधले परीपूर्ण असे ज्ञान घेऊन स्वताला सुसंस्कृत म्हणवतो पण त्याला स्वताच्या देहाचे, देहान्तारगत क्रियांचे आणि देहातील सूक्ष्म आणि कारण अश्या स्ठीतीनचे यथायोग्य ज्ञान नाही, त्यामुळे तोः व्यावाहार्निपून झाला, कार्यकुशल झाला पण मानव म्हणून जीवन जगण्यास असमर्थ ठरला तत्याचे काय? आज तोः शिक्षण घेऊन खूप उच्च पदावर गेला, त्याने खूप मानामाताराब, पैसा अडका, स्थावरजंगम, जमीनजुमला कमावले पण काय गमावले ह्याचे आकलन झाले नाही. ह्या सर्व क्षेत्रान मध्ये अत्यंत उत्तुंग यश मिळवणार माणूस आज त्याच्या परिवारात अयशस्वी ठरला, त्याला समाजात मनाचे स्थान मिळाले परंतु त्याच्या घरात त्याला आपले असे मानणारे आणि प्रेमाने विचारणारे असे राहिले नाही, त्याला प्रसिद्धी खूप मिळाली परंतु ती प्रसिद्धी उप्भिगण्यासाठी अवश्याक असणारी देहाची साथ त्याला मिळाली नाही आणि ह्या सर्वाला तोः अडचण मानून त्याचा दोष कर्म आणि नशिबावर सोडून स्वताच्या चुकांना शब्धांच्या अनावश्यक धालीसमोर लपवू लागला पण असे का झाले ह्याचा विचार करावा अशी सुज्ञ बुद्धी त्यास झाली नाही. त्याला व्यवहार ज्ञानाने समोरच्या माणसाला किंवा प्रसंगाला कसे समोरे जायचे, कसे तोंड द्यायचे हे शिकवले पण त्या गोष्टीची व्यावहारिक तसेच तात्विक आणि भावनिक बाजू आहे हे समजले नाही. कारण व्यावाहार्निष्ट आणि वस्तुनिष्ट विचारासारानिचेच शिक्षण त्याला समाजातून अनुभवायला मिळाले. त्याने कधी हा विचार केलाच नाही कि जसे हे शिक्षण माझे वस्तुनिष्ठ जीवन उधराणार आहे तसेच मला माझे अध्यात्मिक आणि आदि दैविक जीवन उधरायचे आहे, आणि त्यासाठी मला स्वताला आधी वेगळ्या नजरेने बघावे लागेल म्हणजे सर्वप्रथम व्यावहारिक शिक्षणांतून जी एक रुक्षता माझ्या ठायी निर्माण झाली आहे त्याचे मला विस्मरण होऊन माझ्या ठिकाणी मला भाव भावांतून जीवन जगावयास हवे, आज पर्यंत जेवढे भोगजीवन मी जगलो ते बास झाले आता मी भावजीवन पण तेवद्याच यशस्वी आणि समर्थ पाने जनागले पाहिजे. मला आत्ता माझ्या स्वताच्या आत्मातत्वाची, आत्मसंसन्मानाची जाणीव व्हावयास पाहिजे, माझ्या जीवनात ईश्वरीय शक्तीने पैसा अडका, धन संपत्ती, जमीन जुमला, मान्माताराब आदिन्पेक्षा जास्त असे काही दिले आहे ज्या पासून मी आजतागायत वंचित राहिलो आहे, आणि आता मला ते समजून मझे जीवन जगणे आवश्यक आहे. माझ्या ह्या जीवांचा उद्देश हा केवळ पैसा मिळवणे इतकाच मर्यादित असता तर मला नियान्त्याने कदाचित इतका प्रगल्भ नी तरल असा देह दिला नसता, पण तोः त्याने दिला आहे म्हणजे त्याच्या ह्या देण्यामागे निश्चित स्वरूपाचा वेगळा असा कार्यकारणभाव आहे. मी त्या कार्यकारणभावाचा शोध आत्ता माझ्या उर्वरित जीवनात घेणे हे माझ्या जीवनाचे आद्य कर्तव्य असावयास हवे म्हणजे माझ्या जीवांचे कारण काय आहे? मी आज जो अ ब क स्वरूपात वावरतो त्या वावराण्यामागे नक्की अर्थ काय आहे? कोणत्या कारणासाठी माझी निवड ह्या जन्मा नियान्त्याने ह्या अ ब क स्वरूप साठी केली म्हणजे स्व: ची ओळख मला करावयास हवी असा प्रश्न प्रश्न माणसाला पडणे गरजेचे आहे. मानवाला ह्या प्रश्नाची गरज मिर्माण होऊन तोः त्या दृष्टीने जीवनाचे अवलोकन करावयास सुरुवात करेल, त्या क्षणी त्याच्या लक्षात येईल कि आज पर्यंत आकालानातून किंवा इतर माध्यमातून शिकलेले शिक्षण किंवा ज्ञान हे कित्ती निरर्थक आहे. आणि त्याच्या जीवनाचा कित्ती बहुमूल्य असा वेळ व्यर्थ गेला आहे. कारण आजचे शिक्षण आणि शिक्षण देण्याच्या पध्दती ह्या मध्ये कुठेच ह्या विषयांचा अंतर्भाव आपणास दिसून येणार नाही. म्हणूनच हे विषय त्या जीवास तोः लहान असतान आपल्या मातापित्यान कडून, घरातील बुजुर्ग अश्या व्यक्तींकडून, संस्कार  ह्या स्वरूपात दिले जावेत अशी उपाययोजना आपल्या संस्कृती मध्ये केलेली आहे, पण आजच्या जगात हे आपणास दिसते का? ह्या प्रश्नाचे उत्तर दुर्दैवैने नाही असे असलाय्ने जी गोष्ट संस्कार म्हणून वयाच्या ४-१२ ह्या वयात व्हावयास हवी ती गोष्ट वयाच्या ६-०६५ नंतर सुरु होते मग ही ५० वर्षांची तफावत भरून निघणार कधी आणि कशी आणि केंवा? आणि जरी निघाली तरी त्या प्रकरे जगण्यासाठी देहाची तेवढी संपूर्ण साथ लाभणार का? ती लाभली नाही म्हणजे आजचे जीवन हे व्यर्थ गेले, होय शब्ध व्यर्थ आहे कारण ह्याचे द्न्यान नसल्याने आजच्या जीवांचे कारण समजले नाही. आजच्या जीवनासाठी जो विषय आत्मा जन्माला येताना प्रधान विषय म्हणून घेऊन आला तोः विषय तसाच अपूर्ण अवस्थेत राहिला, तसे ही आत्मिक आणि दैहेईक विषयात तफावत असल्याने आजच्या प्राप्त जीवनात जोह विषय आपण स्वताच्या विचाराने प्रधान म्हणून स्वीकारला त्याचे परीपूर्नत्व झाले नाही, म्हंजे तोः विषय पण अपूर्ण राहीला. त्यामुळे ह्या जन्म नंतर जेन्वा परत जनम घेऊ तेंवा आत्ताचा अपूर्ण विषय हा जन्माकार्मातील प्रधान विषय म्हणून आला, आणि ह्याच्या धीच्या जन्मातला विषय हा जन्माजान्मांतार्तील विषय झाला. म्हंजे पहिल्या जन्माचं वेळेस एकाच विषय आत्मा घेऊन आला होता तोच दुसर्या जन्माच्या वेळेस दोन विषय घेऊन आला आणि आत्ता तिसर्या जन्मात तेच विषय तीन झाले. म्हणजे पहिल्या जन्मच्या तीनपट जास्त असचानी आपण तिसर्या जन्मात भोगणार. त्या अडचणीमुळे आपण एकतर पूर्णपणे जीवांचं मुल विषयाकडे दुर्लक्ष करणार किंव आपण पूर्णपणे परावलंबी होऊन भीतीच्या दडपणाखाली जीवन जगणार. आता गम्मत म्हणजे दोष हा सगळा आपलाच आहे पण जेन्वा तिसर्या किंवा चौथ्या किंवा पाचव्या जनमत आपल्या अडचणीमुळे आपण पिचले जाणार तेंवा दोष हा आपल्या नशिबाला किंवा ईश्वराला किंवा कर्माला देऊन मोकळे होणार पण पण पहिल्या किंवा दुसर्या जन्मात काय केले आणि काय करायला पाहिजे होते ह्याचे गणित मांडायला सहजपणे विसरणार. कोणी म्हणेल कि जो संस्काराचा विषय वर नमूद केला तोः विषय तर आपल्या मात्यापित्यानी करावयाच्या संस्काराचा आहे, त्यांनी आम्हाला शिकवले नाही किंवा सांगितले नाही किंवा जीवांची एहे गडद बाजू दाखवली नाही ह्यात आमचा दोष काय? पण यात तुमचा दोष हा आहे कि अश्या प्रतिकूल परीस्ठीमध्ये  आपण जन्म घेण्यास का कारण झालो आहोत ह्याचे संपूर्ण ज्ञान तुमच्या चैतन्यशक्तीला आहे, आणि त्यास ह्या अश्या जन्मच्या फेर्यांमध्ये अडकायचे नाही, प्रतिकूल कर्म परंपरा जास्त होती म्हणून आपण प्रतिकूल परिस्थितीमध्ये जन्माला आलो आहोत पण त्याच बरोबर सत्कार्म ही तेवढेच प्रबळ होते म्हणून माणूस म्हणून आला  आहोत आणि त्या सत्कर्माचा उपयोग करून तोः आत्मा तुम्हाला ह्या प्रतीकुलाते मध्ये पण मार्ग दाखवत असतो पण आपण त्या परीस्ठीच्या असह्यातेचे गुणगान गाण्यात इतके मग्न असतो, किंवा पिचले गेल्याने स्वविश्वास इतका गमावून बसलेले असतो, किंवा त्या दुखाल कुरावालाण्य्ची इतकी वाईट सवय आपली अहंगंडास   लागते कि आपण समोर मार्ग दिसत असता किंवा उपाययोजना जाणवत असताना पण त्या कडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो, मग चूक कोणाची? आई वडील, परिस्थती का तुम्ही स्वत? हा प्रश्न स्वतास विचारायाला नको का? मार्ग आहे, मार्गाचे ज्ञान करून देणार साधन स्वत जवळ आहे, ते साधन स्वताहून तुम्हाला साद घालत आहे, तुमाला स्वताहून त्या मार्गावर ढकलण्याचा प्रयत्न करते आहे, तुम्हाला फक्त त्याच्या सादेला प्रतिसाद देणे इतके साधे काम करायचे असताना, आपण जे दुख दुख म्हणून रडत बसता आहत ते आपल्यास शोभणारे आहे का असे आपण स्वतास नक्की विचारा मागच्या लेखात दिले त्या प्रमाणे जसा ह्या सर्व वलायांचा दुष्परिणाम आपल्या DNA – RNA च्या ठिकाणी होतो तसाच आपण जर कधी स्वताच्या जीवनाचा शोध घेणे ह्यासाठी जीवन जगायला सुरुवात केली तर सकारत्मक परिणाम होणार नाही का? नक्कीच होणार. ह्याच्या मागे महत्वाचे कारण असे कि ह्या कार्मालाहारीन्पेक्षा पण अतिसूक्ष्म आणि प्रभावी स्वरूप कार्य करतात ते भाव किंवा भवतीत भाव. आणि स्वताच्या आतामारूपाच्या जाणीवेच्या संवेदनेपर्यन्त आपण तेन्वाच पोचू जेन्वा आपण आपल्या आत्म्याकडे भावनेच्या नजरेने बघावयास सुरुवात करू. आपल्या डोळ्यावर जी आपण कठोर व्यवहाराची पट्टी बधून जगतो ती सोडून आपण त्या चैतन्याकडे प्रेमाने, आत्मीयतेने, माझे असे समजून जाण्यास लागू तेंवा आपल्या देहातील सुक्षमतम अश्या ग्रंथी स्त्रावण्यास सुरुवात होईल आणि त्या द्वारे आपल्या जीवनाचा पूर्ण पाया बदलला जाईल म्हणजेच त्या ग्रंथीतून स्त्रवणारे जे होर्मोनेस आहेत ते आपल्या पेशी पेशी पर्यंत जाऊन त्यांचे कार्य सुरु करतील, त्या पेशींच्या मुलभूत रचने मध्ये बदल घडवन्याइतकी  शक्ती त्या होर्मोनेस मध्ये असल्याने जे नको असलेले बदल जन्मानंतर देहात धारण झाले ते सर्व परत दुरुस्त हिण्यास सुरुवात होईल, ज्यामुळे आपली जीवनात आपण सहजता, आपुलकी, बांधिलकी, प्रेम, विश्वास अगीकारून सहजपाने आपले जीवन स्वकेंद्रित न ठेवता ते आपल्या परिवारासाठी तसेच समाजासाठी जगण्यास सुरुवात करू. परिवारासाठी जीवन जगायला लागलो सहजपणे जीवनात प्रेम विश्वास निर्माण होऊन आपल्या जीवनाचा एक महत्वाचा उद्देश आपण पूर्ण करू तसेच अश्या प्रकारचे वातावरण परिवारात आणि घरात राहिल्याने आपल्या पुढच्या पिधीवत हेय विषय सहज पाने संस्कार म्हणून घडून जातील, म्हणजेच आपल्या जीवांचा जो एक प्रमुख उद्देश आहे कि आपल्यापेक्षा उत्तम अशी पुढची पिढी आपण निर्माण करून ही जीवनमूल्ये वृद्धिंगत करीत प्रत्येक पिढीत प्रवाहित करावयाची हा सहजपणे पूर्ण होईल. म्हणजेच येथे आपल्या जीवांचे एक महत्वाचे कारण किंवा उदिष्ट आपण पूर्ण केले असे होईल. पण हे सर्व तेंव्हाच घडून येणार जेंव्हा आपल्या सभोवताली तशी अनुरूप परिस्थिती असेल किंवा निर्माण केली जाईल किंवा आपण निर्माण करू तेंव्हा.. जरी मत पत्यांचे आणि इतर जणांचे ह्यात खूप मोलाचे काम असले तरी देखील ते तसे नसल्यास आपण स्वताला स्वताचा गुरु बनवून ह्याचे आकलन करून शिकवायचे आणि शिकवायचे का फक्त रडत बसायाचे हे आपणच ठरवणे योग्य राहील. This entry was posted on June 8, 2015, in अध्यात्म शास्त्र जीवन नियंता and tagged ananant, अहंकार व आ, आचार विचार उच्चार, जीवन उद्देश जगणे, मानव आणि माणूस, मानवी जीवन, education, human life, manav, Spirituality.Leave a commentमनुष्य जीवन २ Jun4आत्ता दुसरा विषय येतो तोः असा कि वृत्ती किंवा प्रवृत्ती ह्यांचा विचाराशी संबंध काय? पण गम्मत अशी आहे कि वृत्ती किंवा प्रवृत्ती ह्या  संस्कारातून ठरत  असतात आणि संस्कार आपले विचार घडवतात . शेवटी वृत्ती म्हणजे तरी काय ? आपण कश्या पद्धतीने जीवन जगतो ती जीवन जगायची पद्धत म्हणजे तर आपला स्वभाव. आणि आपल्या स्वभावाचे अवलोकन केले जाते ते आपल्या विचार आणि  आचारांवरून पण आपला आचार हा ठरतो आपल्या विचारातून कारण माणूस जसा विचार करतो तसाच त्या विचारला तोः  कृतिबद्ध करतो म्हणजे तोह् आचार झाला. आत्ता हा आचार आपल्या जीवनात अडचणीचे कारण कसे काय बनेल तर अगदी साधी गोष्ट आहे ना कि आपल्या आचार वरून आपली जीवन पद्धती ठरतेआणि जीवांची बैठक ठरते जरा कधी आपली जीवन पद्धती चुकीची असेल तर प्राप्त जीवन कसे योग्य असेल सांगा ? प्राप्त जीवन अयोग्य असेल तर जीवनात घडणार्या घटना तरी योग्य असतील का? हा प्रश्न आपणच स्वताला विचारायला नको का? पण मग योग्य आचार किंवा जीवन पद्धत म्हणजे काय असे जर कोणी विच्गारले तर उत्तर काय? कारण योग्य आणि अयोग्य ह्या सापेक्ष गोष्टी नव्हेत का ? जे मला योग्य वाटते समोरच्या साठी योग्य असेलच असे नाही आणि असे असतान योग्य काय आणि अयोग्य काय हे ठरवणार कसे आपण? मग ह्या जगात शाश्वत असे काही बनाही असे मानून जे आत्ता जगतो तेच जगत राहून आपण आपल्या हाताने आपल्या साठी खड्डा खनायाचा का? तर ह्याचे उत्तर नक्कीच नाही असे आहे. कारण सृष्टीमध्ये जरी सगळे अशाश्वत असे तरी निसर्गामध्ये शाश्वत असे तत्व आहे. ते निसर्गातत्व ज्या मूळ शक्तीच्या स्वरूपात आहे त्या शक्तीला आपण आपल्या विचारात धारण करून घेऊन त्या विचारानुसार आपला आचार ठरवला तर हा द्वैताद्वैत खेळ राहणारच नाही पण त्या शक्तीच्या अस्तित्वाची जाणीव आपल्या देहाला आणि देहाच्या माध्यमाला आहे का? ह्याचे ज्ञान आपल्या देहाच्या ठिकाणी आहे का? त्याशाक्तीची जाणीव आपल्या देहात आत्मातात्वाच्या स्वरूपात आहे त्याला आपण कधी आपल्या विचारणे समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे का? नक्कीच केला नसणार कारंन बुद्धी ने बघायला जाल तर तोः कधीच सापडणार नाही आणि आज आपण बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल अश्या प्रकरे जगणायला खूप गौरवास्पद मानतो आणि तश्याच स्वताला खूप मोठे पुरोगामी पण मानतो आणि ते पद आत्यंतिक अभिमानाने मिअरवतो सुद्धा पण जर कधी आपण आपल्या जीवनात आपल्या व्यावहारिक बुद्धीला थोडीशि मनाची म्हणजेच भाव भावनाची जोड दिली तर नक्कीच आपण बुद्धी आणि मान ह्याचा सुरेल संगम आपल्या जीवनात  बांधून घेऊ आणि अपनले जीवन आपण वेगळ्या नजरेने बघायला सुरुवात करू शकतो म्हणजेच येथे आपण आपली जीवन जगण्यासाठी प्रधान असणारा विचार थोडसं बाजूला करून ह्या जीवनाकडे बघायचा दृष्टीकोन बदलला म्हणजे च  आपली आचार विचारांची बैठक इथे बदलली म्हणजेच आपल्या प्रवृत्ती मध्ये बदल झाला म्हनजेच आपली वृत्ती बदली झाली ही वृत्ती घडण्यामागे बर्याचदा असे म्हणाले जाते कि धर्मात अशी शिकवण नाही किंवा धर्मसंस्थेने आम्हाला सांगितले  नाह्ही किंवा शिकवले नाही पण आपण हे का विसरतो कि धर्म संस्था ही मानवानी बनवले आहे पण त्या धर्म संस्थेचा किंवा धारणा संस्थापकाचा जो मूळ उद्देश होता तोः पूर्ण पाने वेगळा नवता का? आताचे जे स्वरूप अपान बघतो त्याला धर्म संस्था नाही तर आत्ताच्या माणसाची खालावलेली विचारसरणी कारणीभूत नाही का? खर्या धर्म चा जो अर्थ आहे कि साहिशुनता दुसर्यांवर प्रेम करणे दुसर्यान्प्रीत्यार्थ आदराची व सन्मानाची भावना ठेवणे आणि सर्व संघटीत एक समाज बनून प्रगती साधने हा आहे तोः आजच्या कालौघात पूर्णतः विस्कळीत झाला नाही का ? ह्याला कोणत्या एक स्पेसिफिक समुदायायाचे लोक कसे कारण असतील आकारण हे समुदाय नंतर आले नाहीत का> आधी माणूसच होता कि… ज्याला आपण शोषण महानले ते शिषण करायची परवानगी कोणी दिली भाऊ? आपणच न? आपण खरा अर्थ काय आहे ह्याचा मागीवा घेतला नाही. कोणीतरी आपल्याला अडवले आत्ता हे न शिकता फक्त त्याच्या बसिस वर आपण दुसर्या समुदायला शिव्या ददेत जगायचे हे बरोबर ठरेल का? एखाद्या काळात शिकण्याची दारे बंद केली गेली म्हणून सगळ्या कलात ती बंद राहणार का? मग जेन्वा ती उघडली आहेत तेंव्हा यतरी आपण ते समजायचा प्रयत्न केला का भाऊ? का व्यर्थ आपला वेळ घालवला? आत्ताच्या जगात जो आपला स्वभाव धर्म म्हणून आपण मिरवतो त्यात कित्येक सध्या गोष्टी आपण विसरून जातो उदारणार्थ साहिशुनता मानवतावाद परस्परांबद्दल प्रेम परस्परांबद्दल प्रेम, आदर आणि सन्मानाची भावना, स्वताची आणि  दुसर्याची प्रगती साधने , स्वताची मौलिक जीवन स्वताकरता नसून ते जीवन दुसर्या करता आहे आणि ते तसेच जगले गेले पाहिजे इत्यादी. आज ह्या संकुचित विचार सरनि मुले जेंव्हा आपलायला अडचण येते तेंव्हा आपण साराव्तोप्रकारे एकटे पडतो आणि मग आपण त्या अडचणीला दुख मानून त्याचा अहंगंड कुरवाळीत अत्यांत शुद्र आणि खालच्या स्तराचे जीवन जगातो जेंव्हा ह्या जीवांचा खरा अर्थ हा खूप वेगळा असा असून त्या निर्माण कर्त्याला आपल्या कडून खुप्प उच्चतम अश्या अपेक्षा असतात हे आपल्या लक्षात येते का ? पण  आपणा कडून कधी दुसर्याला त्याच्या अडचणी मध्ये मदतीचा हाथ दिला गेले नाही आहे आपण कायम दुसर्याला आपल्या पेक्षा नीचतम असे मानले आणि कायम आपण दुसर्याची आपल्या जीवनात उपेक्षा अपमान आणि अवहेलना केली आहे मग आज त्तेच आपले जीवन म्हणून आपल्या समोर प्रकट झाले ह्यात दोष कोणाचा? तुमच्या वागण्याचा? तुमच्या नशिबाचा? तुम्ह्च्या कर्माचा ? तुमच्या देवाचां?  सगळ्यांना नावानं हो म्हणाला पण हे  म्हणाले   नाही कि नाही आमच्या स्वताच्या वागण्याचा हा दोष आहे इतरांना काय देऊ आम्ही? कारण ताली एका हाताने  वाजते का? जसे जीवन आज आपण जगना आपल्या साभिवातली असणाऱ्या सागळ्यानं दिले तसेच आज आम्हला आमच्या पदरात मिळाले ह्या पुढे तरी आम्ही जीवांचा योग्य अर्थ  समजून जगायचा प्रयत्न   करतो. कमीतकमी आमची वृत्ती आणि प्रवूत्ती आम्ही बदलतो जगाचे महित नाही हा विचार तरी केला गेला का? तेवढा जरी केला गेला असता तरी आज कमीतकमी हे सुख धेऊन देह ठेवला असतात कि मी मला जे समजेल त्या प्रकरे जगायचं प्रयत्न केला आहे आत्ता बाकीचे मी बदलू शकत नाही … पण आज मी माझ्या प्रयत्न वर समाधानी आहे. कारण एवढा जरीविचार प्रधान राहिला असता तरी हळू हळू का होईना पण आपल्या सोबत आपल्या आजूबाजूचे जीवन आपण बदलाताना नक्की पहिले असते…

 
 
 

Comments


Post: Blog2_Post

©2020 by भगवत गीता निरूपण. Proudly created with Wix.com

  • Facebook
  • Twitter
  • LinkedIn
bottom of page